अशुद्ध पाणीपुरवठा वरून देवगडात भाजप आक्रमक…

48
2
Google search engine
Google search engine

प्रशासन धारेवर; सांडपाणी मिक्स होत असल्याची नगरपंचायत प्रशासनाची कबुली….

देवगड,ता.११: येथील किल्ला परिसरात गेले काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याबाबत आक्रमक झालेल्या भाजपा नगरसेवकांनी आज देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे यांची भेट घेतली. यावेळी होणारा हा पाणीपुरवठा सुरुवातीचा असल्याने गढूळ होत असून पहिले १० मिनिटे पाणी न वापरता सोडून द्यावे व नंतर पाणी वापरात घ्यावे येणारे पाणी शुद्ध करून वापरावे तसेच या भागाला जादा पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन व सल्ला कांबळे यांनी यावेळी दिला.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरूल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका व माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर महिला तालुकाध्यक्ष उषःकाला केळुसकर, व्ही. सी खडपकर यांच्यासह अन्य नगरसेवक व किल्ला भागातील नागरिकांनी भेट घेतली. दहिबाव परिसरामध्ये केवळ पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असून यामुळे गढूळ पाणी येत आहे पाणीपुरवठ्याची विहीर व गॅलरी यांची कामे अद्यापही पेंडिंग असून ती करणे बाकी आहे. यामुळे अशाच प्रकारे गढूळ पाणीपुरवठा शहराला करावा लागत आहे. पाडाघर योजनेतील पाणी चोरण्याचे प्रकार वाढले असून गस्त घालून ते वॉल बंद करण्याचे काम सुरू आहे तरीही पाणी कमी पडत असून सध्या शहराला दोन दिवस आड पाणी देणे शक्य आहे. सात पायरी पासून पुढे असणाऱ्या सर्व लाईन मध्ये सांडपाणी मिक्स होत असल्याची धक्कादायक कबुली देवगड जामसंडे नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे. यामुळे देवगडकरांना होणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी केला. मात्र गढूळ पाणी न पुरवतात शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन सुरज कांबळे यांनी दिले.