ॲड. संपूर्णा कारंडे; जिल्ह्यातील दावे प्रलंबित पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन…
सिंधुदुर्गनगरी,ता.२४: उच्च न्यायालयातील प्रलंबित दावे सामोपचाराने सोडविण्यासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत लोक अदालत आयोजित केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव ॲड. संपूर्णा कारंडे यांनी केले आहे.
यासाठी तालुका आणि जिल्हा विधी सेवा समितीकडे आपला अर्ज दाखल करावा. २०२४ या वर्षातील दुसरी लोक अदालत २७ जुलै ला पूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोक अदालत या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले दावे सोडविण्यासाठी २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यात पूर्ण महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयात दावे प्रलंबित असलेले पक्षकार सहभागी होवू शकतात, अशी माहिती ॲड. संपूर्णा कारंडे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.