शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी आंबोलीत “सिक्युरिटी टाईट”…  

185
2
Google search engine
Google search engine

५० हून अधिक पोलिसांची कुमक; वाढते अपघात व गैरप्रकार रोखण्यासाठी निर्णय…

सावंतवाडी,ता.२७: वर्षा पर्यटनासाठी येणार्‍या अतिउत्साही पर्यटकांकडून होणारे प्रकार आणि वाढते अपघात लक्षात त्या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी ५० हून अधिक पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. काल झालेला अपघात आणि गेल्या काही दिवसात घडलेल्या अपघाताची संख्या लक्षात घेता याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुुळे वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आता आंबोलीत आणखी कडक बंदोबस्त असणार आहे.

गेल्या आठवड्यात त्या ठिकाणी येणार्‍या अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यात लायसन्स नसणे, ट्रिपल सिट, धागडधिंगा घालणे आदी प्रकार करणार्‍यांवर दंडाची कारवाई करण्यात आली होती. मात्र ट्रिपल सिट येवून तसेच मध्यधुंद अवस्थेत वेगाने गाड्या हाकणार्‍या पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हा बंदोबस्त ठेवला जाणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.