निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील लोकांना मदतीचा हात दया…

160
2
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी…

कुडाळ,ता.०५: निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील नुकसानग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी निवेदनाव्दारे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.
त्यात असे नमुद केले आहे की, दोन दिवसापुर्वी आलेल्या निसर्ग वादळामुळे सिंधुदूूर्ग रत्नागिरी,रायगड अलिबाग येथिल लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान एकीकडे कोरोनाचे संकट असताना अचानक दाखल झालेल्या या चक्रीवादळामुळे आता नुकसान दुप्पट झाले आहे. त्यामुळे या सर्वाची तात्काळ दखल घेवून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.