परशुराम उपरकर ; सरपंचांनी पत्रकबाजीची भूमिका घेतल्यामुळे व्यापार अडचणीत
सावंतवाडी.ता,१९: आमदार दिपक केसरकर यांनी आता किमान चाकरमानी म्हणून, तरी जिल्ह्यात यावे,आम्ही त्यांचे मनसेकडुन स्वागत करू असा, टोला मनेसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.दरम्यान जिल्ह्यातील सरपंचांनी घेतलेल्या पत्रकबाजीच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात ऐन चतुर्थीत सुध्दा चाकरमानी आले नाहीत. परिणामी आता त्याचा फटका येथिल व्यावसायिकांना सोसावा लागणार आहे,असे ही त्यांनी सांगितले.श्री उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.
यावेळी शहर अध्यक्ष आषिश सुभेदार,वैभव कीनळेकर, शुभम सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री उपरकर यांनी केसरकर यांच्यावर टिका केली.ते म्हणाले,या ठीकाणी बांदा तपासणी नाक्याच्या ठीकाणी होणारे पर्यटन केंद्र हरीत लवादाकडुन स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे केसकरकर कोणतेही प्रकल्प अर्धवट परवानग्या घेवून करीत होते. हे आता उघड झाले आहे,असा टोला श्री उपरकर यांनी लगावला.