नाटळ जाधवाडीतील पाच घरांना पुराचा वेढा…

1276
2
Google search engine
Google search engine

वाडीशी संपर्क तुटला ; नागरिक भीतीच्या छायेत…

कणकवली, ता.२२ : तालुक्यातील नाटळ जाधववाडी (ब) मधील पाच घरांना पुराचा वेढा पडला आहे. तर दोन घरांमध्ये पाणी शिरले आहे. यातील विजय लवू जाधव यांचे अर्धे घर पाण्याखाली गेले आहे. तर सुनील संतोष जाधव यांच्या घराच्या उंबर्‍यापर्यंत पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर सर्व पाच घरांमध्ये पुराच्या पाण्याचा धोका आहे. सध्या या पाच घरांतील नागरिक भीतीच्या छायेत असून त्यांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. गडनदीला महापूर असल्याने जाधववाडी (ब)मधील पाच घरातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी देखील जाता येत नसल्याची स्थिती आहे.