बांद्यातील पुरग्रस्तांना सरसकट मदत द्या…

107
2
Google search engine
Google search engine

जावेद खतिब ; सगळ्यांचेच नुकसास झाले,त्यामुळे अटी नको…

बांदा,ता.३१: पंचनामा आणि नुकसानीची अट न ठेवता बांदा येथिल सर्वच नुकसानग्रस्तांना सरसकट धान्य वाटप करा,कोणावर अन्याय होवू देवू नका,अशी मागणी बांदा येथिल भाजपाचे पदाधिकारी तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी प्रशासनाकडे केली आहे.
पुरात मोठ्या प्रमाणात शहरातील लोकांचे नुकसान झाले आहे.परंतू काही लोकांचे अद्यापपर्यत पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे अनेक लोक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्या,अशी मागणी श्री खतिब यांनी केली आहे. याबाबत प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी माहीती दिली आहे.