कुडाळ,ता.१८:कळसुली गावांतील पुनर्वसन भागातील १०० हुन अधिक रहिवाश्यांना भेडसावणाऱ्या समस्या खासदार विनायक राऊत यांनी जाणून घेत त्यावर चर्चा केली. यावेळी पुनर्वसन मधील भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. राऊत यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, माजी जि.प. सदस्य बाळा भिसे, जि.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकाप्रमुख राजू राणे, विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, जि.प. सदस्य लॉरेन्स मान्येकर, शाखाप्रमुख नंदू परब आदी उपस्थित होते.
येथील गावातील समस्या बरीच वर्षे १८ नागरी सुविधा व समस्या वाऱ्यावर होत्या. रस्ता व स्वेच्छा पुनर्वसन मधील नागरिकांची उन्हाळी हंगामात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत होती. तसेच पुनर्वसन कडे येणारा ३ कि.मी. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने एसटी वाहतूक बंद होती. कळसुली देदोनवाडी धरणाचं काम बरेच वर्षे रेंगाळले, बंधाऱ्याचा काही भागावर भगदाड पडली. तसेच धरणाच्या बंधाऱ्यावर वाढलेली झाडे तातडीने तोडा, कळसुली गावातील गडगेवाडी रस्ताची डागडुजी व्हावी, बीएसएनएल टॉवरचे नेटवर्क अचानक गायब होत. याबाबत ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच्या समोर पुनर्वसन मधील भेडसावणाऱ्या समस्यावर चर्चा केली. या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. राऊत यांनी दिले.
कळसुली पुनवर्सन ग्रस्तांची खासदार राऊतांनी घेतली भेट…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.