अन्नसुरक्षा परवाना नसल्यास खाद्यपदार्थ विक्री करता येणार नाही…

3
2
Google search engine
Google search engine

जगदीश मांजरेकर; परवाना नूतनीकरण व नोंदणी करून घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी ता.०५: अन्नसुरक्षा परवाना नसल्यास यापुढे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शनिवार ८ जानेवारीला सावंतवाडीला आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात व्यापाऱ्यांनी आपल्या परवाना नूतनीकरण किंवा नोंदणीकरण करून घ्यावात, असे आवाहन सावंतवाडी व्यापारी संघाच्या वतीने जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे, त्यात असे नमूद केले आहे की, खाद्यपदार्थ विक्रीसाठी अन्न सुरक्षा परवाना व नोंदणी घ्यावी लागते. ती नसल्यास माल घेता व विकता येणार नाही. हाॅटेल, रेस्टॉरंट, बार, बेकरी, मिठाई, किराणा, पान स्टाॅल, स्टाॅल धारक, घरगुती खानावळ, मासे विक्रेते, मटन विक्रेते, चिकन विक्रेते, भाजी विक्रेते, फळ विक्रेते व जे खाद्यपदार्थ विक्री करतात त्या सर्वांनाच अन्न सुरक्षा परवाना घेणे जरूरीचे आहे. तो न घेतल्यास १००००/-रू. ते १०००००/-रू. पर्यंत दंड व कारावास होऊ शकतो.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यवसायिक संघ यांच्या वतीने शनिवारी ८ जानेवारीला सकाळी १०.३० ते ४ वाजेपर्यंत सावंतवाडीच्या नगरपालीका व्यापारी संकुलन येथे पहिल्या मजल्यावर आयोजित करण्यात आला आहे. कृपया वेळेत हजर राहून परवाना नूतनीकरण अथवा परवाना नोंदनी करण करून घ्यावेत हि नम्र विनंती. अधिक माहीतीसाठी अरविंद नेवाळकर ९८९०२९१६०७, जगदीश स.मांजरेकर ९४२२३७९६०४, नितीन वाळके ९४२२०५४५८८ यांच्याशी संपर्क साधावा