कारीवडे सोसायटीवर आर्थिक बोजा नको म्हणून शिवसेनेने माघार घेतली…

4
2
Google search engine
Google search engine

संदीप माळकर; “क्रेडिट” घेणाऱ्यांनी सोसायटी अडचणीत का आली, याचा अभ्यास करावा…

सावंतवाडी,ता.०२: कारीवडे सोसायटी थकीत असल्यामुळे पुन्हा आर्थिक बोजा नको म्हणून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणी याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप ऊर्फ बाळू माळकर यांनी लगावला आहे. दरम्यान सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यामागे शेतकरी व सभासदांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या निवडणुकीचे श्रेय घेण्या-यांनी सोसायटी थकित का ? याचाही अभ्यास करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी माघार घेतल्यामुळे कारवडी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली, असा दावा तेथील भाजपचे युवा नेते महेश सारंग यांनी केला होता. याला श्री. माळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.