विलवडे नदीतील गाळ तसाच, ठेकेदार वाळू-दगडात गुंतला…

3
2
Google search engine
Google search engine

मनसेच्या श्रीराम सावंतांचा आरोप; पुन्हा पूर आल्यास महसूल जबाबदार…

बांदा,ता.०२: विलवडे येथील नदीत पूरपरिस्थितीला जबाबदार ठरणारा गाळ तेथेच सोडुन संबंधित ठेकेदार फक्त वाळू आणि दगड करण्यात गुंतला आहे. त्यामुळे यावर्षी पुन्हा नुकसान झाल्यास त्याला महसूल यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा विलवडे मनसेचे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी दिला आहे. या ठिकाणी सुरू असलेली मोहीम स्वतःच्या फायद्यासाठी होत असल्याचा संशय आहे. त्यांच्यावर नजर ठेवणारी समिती सुध्दा गायब आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होणार की नाही याबाबत शंका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत श्री. सावंत यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.