प्रसाद लाड; सोमय्यां विरोधात केलेली वक्तव्य असंवेदनशील, गंभीर दखल घेणार…
मुंबई,ता.१५: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे “खोदा पहाड, निकला चूहा” या सारखी झाली, अशी खिल्ली आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना उडवली. दरम्यान किरीट सोमय्या यांच्याविरोधात श्री. राऊत यांनी केलेली वक्तव्य असंवेदनशील आहेत. त्यांची आम्ही गंभीर दखल घेऊ, तर त्यांचे मानसिक संतुलन ढासळल्यामुळे ते तसे बोलत आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. श्री.राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर श्री.दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
श्री.लाड पुढे म्हणाले, राऊत यांनी बिथरलेल्या अवस्थेत पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेत्यांवर टीका केली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी नेमके काय बोलून दाखवले, हे त्यांचे त्यांनाच स्पष्ट झाले नाही. तर सोमय्यां विरोधात त्यांनी केलेली वक्तव्य ही असंवेदनशील होती. त्याची आम्ही गंभीर दखल घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.