पियाळीतील ऊस बागायतींना आग, लाखो रुपयांचे नुकसान…

4
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.०६ : तालुक्यातील पियाळी येथे आज भर दुपारी ऊस बागायती शेती ला आग लागली असून यामुळे लाखो रुपये चे नुकसान झाले आहे. ऊस बागायती बरोबरच इतर ही काजू कलम चे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भर दुपारी आग लागल्याने व वारा ही सुटल्याने आग अजून ही सर्व माळ राना पर्यंत भडका उडाला आहे.
दरवर्षी येथे आग लागून ऊस बागायती शेती चे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.गेल्या वर्षी ही आग लागल्याने नुकसान झाले होते.वेळोवेळी पंचनामे केले परंतु अद्याप ही कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने यावेळी नुकसानाची नोंदणी करावी वाटत नसल्याचे ऊस बागायती शेतकरी रविंद्र ऊर्फ बाबू घाडीगांवकर यांनी बोलताना सांगितले आहे.