आठवडा बाजार कुठे न्यावा, हे जनतेनेच ठरवावे, आम्ही त्यांच्या सोबत…

19
2
Google search engine
Google search engine

राजन तेली;स्थलांतराचा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, संजू परब…

सावंतवाडी,ता.३१: मंगळवारचा आठवडा बाजार हलविण्यासंदर्भात प्रयत्न होत असताना ठाकरे गटासह अनेकांकडून विरोध आहे. परंतु या पार्श्वभूमीवर बाजार हलविण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही लोकांसोबत आहोत ते जशी मागणी करतील तसा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे स्पष्ट केले. दरम्यान आठवडा बाजार हा मोती तलावाच्या काठावर योग्य आहे. लोकांशी चर्चा करून हा बाजार त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता. त्यामुळे तो स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.
आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत या दोघांना आठवडा बाजारा संदर्भात भूमिका विचारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी श्री. तेली म्हणाली, येथील तलावाच्या काठावर भरणारा आठवडा बाजार जर जनतेला व व्यापाऱ्यांना मान्य आहे तर आम्हीही जनतेच्याच बाजूने राहणार आहोत.