कणकवली, ता.१५ : महामार्गावर जानवली येथे पादचाऱ्यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाला काल (ता.१४) फोंडाघाट येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर हयगयीने वाहन चालवून पादचाऱ्याला मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील जानवली बस थांबा येथे काल (ता.१४) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मंगला जाधव (वय ७०) आणि त्यांचा मुलगा शरदचंद्र रामचंद्र जाधव (वय ४७) हे रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी गोवा ते कोल्हापूर जाणाऱ्या कार (एमएच ०३ बीएस ४४८०) ने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर कार चालक पळून गेला. अपघातानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर या कार चालकाला फोंडाघाट चेकपोस्ट येथे ताब्यात घेण्यात आले.
कार चालक वेदांत जयवंत शेलार (वय २५, रा. पारगाव, कोल्हापूर) हा गोवा ते कोल्हापूर असा भरधाव वेगाने जात होता. अपघातानंतर तो घटनास्थळी न थांबता पळून गेला होता. दरम्यान या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यात शरदचंद्र जाधव याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मंगला जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघात प्रकरणी मयत शरदचंद्र जाधव याचा चुलत भाऊ आनंद जाधव याने कार चालकाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार कार चालक वेदांत शेलार याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.
अपघात प्रकरणी फरार कार चालक फोंडाघाट येथून ताब्यात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.