मनसेच्या दणक्यानंतर मळगाव येथील बीएसएनएल मोबाईल सेवा सुरळीत…

50
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२७: मनसेच्या दणक्यानंतर मळगाव येथे अखेर बीएसएनएल मोबाईलची सेवा सुरळीत झाली आहे. त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची समस्या निर्माण झाल्यामुळे हा व्यत्यय येत होता. याबाबत ग्रामस्थांची नाराजी होती. परंतू मनसेच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत उचल घेवून दोन्ही खात्यातील अधिकार्‍याशी चर्चा केल्यानंतर हा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे मळगावात विनाव्यत्यय मोबाईल सेवा सुरू झाली आहे, असा दावा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला आहे.