तर ..वैभव नाईकांची 25 हजार मते वाढली असती…

84
2
Google search engine
Google search engine

अतुल बंगे:निलेश राणेंना टोला,रणजित देसाईवर टीका…

कुडाळ ता.०९:

विधानसभेत कुडाळ-मालवण मतदारसंघात वैभव नाईक विरुद्ध नितेश राणे,अशी लढत झाली असती तर आमदार नाईक २५ हजाराच्या मताधिक्क्याने विजयी झाले असते,असा पलटवार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी आज येथे केला.खासदार निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना श्री.बंगे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशु व कृषी सभापती रणजित देसाई यांचाही त्यांनी समाचार घेतला.रणजित देसाई हे स्वतःच्या पैशातून प्रदर्शन घेत नसून,शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या निधीतून प्रदर्शन घेतात.त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या वर बोलू नये,असा सल्ला बंगे यांनी दिला.माजी खा डॉ.निलेश राणे यानी आम.वैभव नाईक यांचेवर केलेल्या टीकेला श्री.बंगे यानी प्रत्युतर दिले.
यावेळी संजय भोगटे,संतोष शिरसाट,बबन बोभाटे,सचिन काळप,बाळा वेगुर्लेकर,मंदार शिरसाट,राजू गवंडे,सतीश कुडाळकर आदी उपस्थित होते.