अधिवेशनात तोंडघशी पडणार म्हणून राठोडांचा राजीनामा घेतला…

172
2
Google search engine
Google search engine

राम कदम ; अखेर महाविकास आघाडी सरकार जनतेसमोर झुकल्याची टिका…

सावंतवाडी ता.२८: अधिवेशनात राज्य सरकारला तोंडघशी पडावे लागणार आहे.हे माहिती असल्यामुळेच त्यांना वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला,असा टोला आमदार राम कदम यांनी आज लगावला.दरम्यान राजीनामा घ्यायचा होता,तर एवढे दिवस का लागले,असा सवाल करत अखेर महाराष्ट्राच्या जनते समोर सरकारला झुकलेच,असाही आरोप त्यांनी यावेळी केला.आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब,शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, माजी सभापती ॲड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, तालुकाध्यक्ष महेश धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, संजय शिरसाट आदी उपस्थित होते.