गोव्यात कामाला जाणाऱ्या युवक-युवतींची अडवणूक नको…

363
2
Google search engine
Google search engine

गुरुदास गवंडे ; मुख्यमंत्र्यांनी योग्य तो तोडगा काढावा, मनसेची मागणी…

सावंतवाडी,ता.१३:सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात कामाला जाण्यासाठी युवक-युवतींची अडवणूक करू नये. त्यांना कामावर जाता यावे यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकारात्मक तोडगा काढावा,अशी मागणी सावंतवाडी तालुका मनसेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी केली आहे.गोव्याचे व सिंधुदुर्गाचे अनेक वर्षापासूनचे नाते आहे.त्यामुळे सकारात्मक भूमिकेसाठी योग्य तो प्रयत्न करावा,त्यासाठी कोरोना तपासणीच्या अहवालाची सक्ती करणे योग्य नाही.याबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे,असे त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.