उदय सामंतांचा विश्वास; “ते” पायाने गाठ मारतील, ती विरोधकांना हाताने सुटणार नाही…
सावंतवाडी ता.२७: दीपक केसरकरांनी मनावर घेतलं, तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच काय, जिल्हा परिषदा सुध्दा नक्कीच ताब्यात येतील. ते शांत आहेत, याचा अर्थ कोणी उलटा घेवू नये. ते पायाने जी गाठ मारतात ती अनेक विरोधकांना हाताने सुटत नाही. नडणा-या विरोधकांना त्यांनी सहजपणे झोपवले आहे, असे मत पालकमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले. याठिकाणी आयोजित शिवसंपर्क अभियान मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई, आमदार दीपक केसरकर, पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर, अरुण दुधवडकर जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन महामंडळ उपाध्यक्ष संदेश पारकर,जेष्ठ नेते अण्णा केसरकर,तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राजन पोकळे, विक्रांत सावंत, सागर नाणोसकर, रुची राऊत, जयेंद्र परुळेकर, जानवी सावंत, बाबुराव धुरी आदिंसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.