उदय सामंताचा चिमटा ; कोणाच्या दादागिरीचा किंवा धमकीने निर्बंध उठवले नाहीत
सावंतवाडी ता.१८: कोणाच्या दादागिरीचा कींवा धमकीचा विषय नाही.सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब आणि कणकवलीचे समीर नलावडे हे दोघेही आपले चांगले मित्र आहेत.त्यामुळे वादाचा कींवा दादागिरीचा प्रश्नच नाही,असा चिमटा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत काढला.यावेळी लोकांची आणि व्यापार्यांची मागणी लक्षात घेता आपण स्तर तीन प्रमाणे अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे.त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील सर्व काही सुरळीत सुरू होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्री.सामंत यांनी झुम मिटींगच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साशला.यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले,कोणाच्या धमकीने आणी दादागिरीने आपण अनलॉकचा निर्णय घेतला असे कोण म्हणतील तर ते चुकीचे ठरणार आहे.या ठीकाणी अनलॉक करावे आपण कोरोनाचे नियम पाळू असे येथिल व्यापार्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा आदर ठेवून आपण हा निर्णय घेतला आहे.त्यामुळे कोण काय बोलले आणी कोणी काय धमकी दिली .हे आपल्याला माहीती नाही,असेही श्री. सामंत म्हणाले