वैभव नाईकांनी आणलेला कोट्यावधीचा निधी कागदावरच..

205
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओंकार तेलीं; आम्ही कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न केले, यांनी दुकान उघडी ठेवली..

कुडाळ,ता.०४:येथील आमदार वैभव नाईक हे कोट्यावधीचा निधी आणतात पण त्यांनी आणलेला निधी नेहमीच कागदावरच राहतो,अशी टीका नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.कोरोनाच्या काळातही कोणतेही राजकारण न करता नगरपंचायतीने कुडाळ शहर कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न केलेत.मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवली.

दरम्यान कोणी मुख्याधिकाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःची दुकाने चालू ठेवली,हे सुद्धा बाहेर काढू,असा इशारा यावेळी त्यांनी बोलताना दिला.श्री तेली पुढे म्हणाले,आधी भूसंपादन आणि नंतर काम हे तत्व असताना मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून ३०८ खाली हा ठराव पाठवण्यात आला.पालकमंत्री व आमदार यांच्या दबावाखाली आमच्यावर केस केली.परंतु आमदारांच्या बाजूने केस झाली असेल तर दोन कोटी नगरपालिकेकडे का वर्ग केले नाहीत,असाही सवालही त्यांनी यावेळी केला.

\