अबीद नाईकांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांतून समाधानाचे वातावरण…
कणकवली,ता.३१: येथील वागदे-कसवण रस्त्यांची अखेर दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे त्याचा लाभ परिसरात चार गावांना होणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक यांना दोन आठवड्यापुर्वी पाहणी केली होती. दरम्यान रस्ता पुर्ण होवून आता एसटी सुरू होणार असल्यामुळे गावात समाधानाचे वातावरण आहेे. हा रस्ता तब्बल चार फुट खचला होता. त्यामुळे तो दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी गेले अनेक दिवस होती. यासाठी १० ऑगस्टला श्री. नाईक यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना घेवून पाहणी केली होती. तसेच हा रस्ता तात्काळ सुरू करण्या संदर्भात योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार रस्त्याचे काम करण्यात आले आहे, अशी माहीती बांधकामच्या अधिकार्यांकडुन आज नाईक यांना देण्यात आली. त्यानुसार श्री. नाईक यांनी बांधकामच्या अधिकार्यांचे आभार मानले आहेत.