उदय सामंत; सर्वांना सोबत घेऊन चिपी विमानतळाचे उद्घाटन करू…
सावंतवाडी,ता.२७: “कोरोनाचा टू” आल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही रिस्क नको म्हणून अद्यापपर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही. याबाबत आपत्कालीन यंत्रणेशी योग्य ती चर्चा करून निर्णय घेऊ, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. श्री सामंत यांनी आज येथे भेट दिली.
दरम्यान चिपी विमानतळ उद्घाटनाला सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाईल. हा नको, तो नको अशी कोणतीही भूमिका घेतली जाणार नाही. हे काम सांघिक आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन उद्घाटन केले जाईल. मात्र उद्घाटनासाठी २६ जानेवारीचा मुहूर्त कोणी काढला. हे मात्र माहीत नाही, असे ही त्यांनी सांगितले. श्री.सामंत हे आज आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, “कोरोना टू” येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबाबत अद्यापपर्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यापासून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. चिपी विमानतळ उद्घाटन करताना हा नको, तो नको असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. सर्वांना घेऊन करणार आहोत.