४ जानेवारीला अर्ज माघार घेण्याची मुदत…
वैभववाडी,ता.३१: तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या १०३.जागासाठी आलेल्या २३६.अर्जापैकी २ अर्ज अवैध झाले आहेत.तर उर्वरित २३४ अर्ज वैध ठरले आहेत.तहसिलकार्यालयात छाननीसाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.काही ग्रामपंचायतीत काही सदस्य बिनविरोध झाले आहेत. ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर निवडणूकीचे चिञ स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.गुरुवारी आलेल्या सर्व अर्जाची छाननी करण्यात आली.यामध्ये कोकिसरे ग्रामपंचायतीचा एक तर वेंगसर ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे.तर २३४ अर्ज वैध ठरले आहेत.
यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.त्यामुळे जोरदार रस्शीखेच होणार आहे.अर्ज ४ जानेवारीला मागे घेतल्यानंतरच प्रत्येक ग्रामपंचायतीचे चिञ स्पष्ट होणार आहे.