वैभव राऊळ; “त्या” कोरोना केंद्राला विरोध कुठे दिसलाच नाही…
आंबोली ता.०७: येथील पंचक्रोशीत झालेली रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. चूरणीची मूस रस्ता, बेरडकी रस्ता ,फौजदार वाडी रस्ता अशी सर्व रस्त्यांची कामे एकदम निकृष्ट झाली.त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव राऊळ यांनी केली. दरम्यान आंबोली बस स्थानकात कोरोना तपासणी केंद्र उभारण्यास तीव्र विरोध करणारे शिवसेनेचे पदाधिकारी कुठे दिसलेच नाही.गेली दोन वर्षे याच ठिकाणी शासकीय जागेत तपासणी केंद्र असल्याने बस मधून उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे सोयीचे होते.शिवाय नोडल अधिकारी,पोलीस,आरोग्य विभाग या सर्वांना सोयीस्कर आहे.या ठिकाणी तपासणी केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे भाजप तर्फे आम्ही स्वागत करीत आहोत.. बसस्थानकात १० वर्षे शौचालय बांधून होत नाही. आंबोली आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ अशी घोषणा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती त्याचे काय झाले.असा सवाल त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,